नागरीकांच्या तक्रारीची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल
नागरीकांच्या तक्रारीची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल
लातूर प्रतिनिधी : शनिवार ४ जानेवारी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची नुकतेच
हरंगुळ व भोईसमुद्रगा येथील नागरिकांनी भेट देऊन कळंब रस्ता खराब झाला
आहे, यामुळे येजा करण्यासाठी अडचण होत आहे, तरी या रस्त्याची दुरुस्ती
करण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेऊन ३१
डिसेंबर रोजी स्वतः या ठिकाणी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली होती आणि
संबंधित अधिकाऱ्यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
आज दि. ४ जानेवारी रोजी पासून रस्त्याची दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू
झाले आहे.
याबाबत संदर्भाने बोलताना, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक
कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही.
रस्त्यांची दुरुस्ती ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अतिशय महत्त्वाची
आहे. यामुळे नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली
आहे. लवकरच हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त होईल आणि नागरिकांना सुलभ प्रवास
करता येईल असे सांगीतले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0