दयानंद विज्ञान महाविद्यालयातील पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोप
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोप
लातूर : कार्यालयीन कामकाजासाठी डिजिटल साक्षरतेबरोबर कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचे असते,असे प्रतिपादन संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले.
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे " शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल साक्षरता विकसित करणे " या विषयावर पाच दिवसीय संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यशाळेच्या समारोप व प्रमाणपत्र वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी संगणकशास्त्र विभाग समन्वयक डॉ.संगीता जाजू ,कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.अरुणा चौधरी,कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आणि कनिष्ठ लघु लेखक बन्सी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे जाऊन त्या असेही म्हणाल्या की,बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीच्या ज्ञानाबरोबर संवाद कौशल्याचे ज्ञान प्रत्येकांनी घेऊन कार्यालयीन कामकाज सुरळीत केले पाहिजे,असेही सांगितले.महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळा समारोप प्रसंगी शिक्षकेत्तर कर्मचारी बालाजी चित्ते,क्षिरसागर,सुदर्शन सर्जे,दिलीप राठोड ,बाजपेयी यांनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.तसेच या कार्यशाळेमध्ये नेटवर्क अँड हार्डवेअर,पेजमेकर आणि कॅनव्हा सॉफ्टवेअर, कम्युनिकेशन स्किल या विषयावरती प्रा.कृष्णा सारडा, प्रा.वैभव कुलकर्णी,प्रा.दीपाली दाडगे आणि प्रा.आशा बोराडे यांनी प्रशिक्षण दिले.
सूत्रसंचालन प्रा.आशा बोराडे यांनी केले तर प्रा.अरुणा चौधरी यांनी आभार मानले.याप्रसंगी संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0