कृषी संस्कृती महोत्सवातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
कृषी संस्कृती महोत्सवातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
कार्यक्रमात लातूरकरांचा मोठा सहभाग
लातूर / प्रतिनिधी- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथील दयानंद सभागृहात १२ ते १४ मार्च दरम्यान सायंकाळी ५ ते रात्री ८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषि संस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चैतन्य कुलकर्णी, विनल देशमुख, कुणाल वराळे, श्रावणी महाजन यांच्या चमूने सादर केलेल्या लोकगीतांचा लातूरकरांनी मनमुराद आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी या कृषी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात चैतन्य कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सुर निरागस हो........या गणपतीच्या आराधनेने झाली. नंतर विनल देशमुख यांनी सादर केलेले पड रं पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लई तन्हेल चातकावाणी........, माझ्या ढवळ्या नी पवळ्याची जोडी जिवाहूनी प्यारी ........, निसर्ग राजा ऐक सांगतो......., राजा ललकारी......, जांभूळ पिकल्या झडाखाली......., ग साजणी....., या एकाहून एक सदाबहार कृषी जीवनाचे दर्शन घडविणारे, शेतकऱ्यांवर आधारीत व चित्रित केलेली गाणी सादर करण्यात आले. गायिका श्रावणी महाजन यांनी सादर केलेली यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, या गवळणीला प्रतिसाद देत या गाण्यावर सभागृहातील रसिक श्रोते ताल धरताना दिसले. यासोबतच घागर घुमू दे, घुमू दे......, झुंझुमुंझु पहाट झाली, कोंबडीन बांग दिली...... या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांना खिळवून ठेवले.प्रत्येक सादरीकरणाला लातूरकर रसिक श्रोते भरभरून प्रतिसाद देत होते. या सुंदर कार्यक्रमाचे निवेदन.पुजा थिगळे यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक बि.एम.घोलप.निमंत्रण अनिल पुरी यांनी यांचे सहकार्य होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0