चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी केले स्वागत
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी केले स्वागत
लातूर प्रतिनिधी : शुक्रवार १० जानेवारी २५
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय संस्थेच्या प्रसिद्ध वक्ते ब्रह्मकुमारी
शिवानी दिदींचे प्रेरणादायी व्याख्यान उदगीर येथील जि.प. मैदान तालुका
क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
नागरिकांनी उपस्थिती लावली होती. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन
वैशाली विलासराव देशमुख यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित
राहून ब्रह्मकुमारी शिवानी दिदींचे स्वागत केले.
या प्रसंगी ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांनी आपल्या व्याख्यानात जीवन
मूल्यांचे महत्त्व, आध्यात्मिक जागृती आणि आत्मिक शांती या विषयांवर
मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना सकारात्मक विचारांचे महत्त्व
सांगितले आणि जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती कशी वाढवायची
याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय संस्थेच्या ब्रह्मकुमारी शिवानी
दिदी यांची विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव
देशमुख यांनी भेट घेऊन लातूर शहर आणि परीसरातील नागरीकांना आपले
मार्गदर्शन ऐकता यावे यासाठी आपला वेळ दयावी अशी विनंती केली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0