माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला सत्कार
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला सत्कार
लातूर प्रतिनिधी : सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील गोरोबा राम आरदवाड यांनी सफाई
कामगारांच्या वारसा हक्कासाठी केलेल्या न्यायालयीन लढ्यात न्याय मिळाला,
त्यांनी महिला व बालविकास विभागातून सफाई कामगार म्हणून स्वेच्छा
सेवानिवृत्ती स्विकारल्यानंतर आपल्या मुलाला वारसा हक्काने हीच नोकरी
मिळावी, यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्यांच्या या लढ्यामुळे
महाराष्ट्रातील आस्थापनेवरील हजारो सफाई कामगारांना न्याय मिळाला आहे. या
बददल बाभळगाव येथे माजी मंत्री आमदार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
नुकताच गोरोबा राम आरदवाड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोरोबा राम आरदवाड यांनी हा न्यायालयीन लढा उभारण्यासाठी वेळोवेळी
मार्गदर्शन केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे
आभार मानले.
काय आहे प्रकरण?
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील गोरोबा राम आरदवाड यांनी महिला व
बालविकास विभागातून सफाई कामगार या पदावरून २०१८ मध्ये महिला व बालविकास
विभागातून सफाई कामगार म्हणून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. लाड - पागे
समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या
अंमलबजावणी बाबत त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे आपल्या मुलाला वारसा
हक्काने मुलाला ही नोकरी मिळावी, अशी मागणी केली होती. परंतु विभागाने
त्यांची ही मागणी फेटाळली. या विरोधात त्यांनी महारा्ष्ट्र प्रशासकीय
न्याय प्राधीकरणाकडे मॅटकडे न्याय मागीतला. मॅटच्या आदेशाने मॅटच्या
आदेशानुसार विष्णू गोरोबा आरदवाड यांना सफाई कामगार म्हणून कामावर रुजू
करुन घेण्यात आले.
न्यायालयाचा निर्णय:
मॅटच्या आदेशानुसार विष्णू गोरोबा आरदवाड यांना सफाई कामगार म्हणून
कामावर रुजू करून घेतल्यानंतर महिला व बालविकास विभागाने मॅटच्या आदेशाला
उच्च न्यायालयात आव्हान दिले तेव्हा कोर्टाने ८ जानेवारी २५ रोजी निकाल
देताना गोरोबा राम आरदवाड प्रकरणात मॅटने दिलेला निर्णय आस्थापनेवरील
सर्वांसाठी कायम ठेवला त्यामुळे अशा प्रकरणातील महाराष्ट्रातील
नगरपंचायत, नगरपालिका महानगरपालिका आदी विविध विभागातील आस्थापनेवरील ९
हजार सफाई कामगारांना हा निर्णय लागू झाला तसेच २४ फेब्रुवारी २०२३ च्या
सफाई कामगारांच्या व्याख्येच्या शासन निर्णयाची स्थगितीही कोर्टाने
उठवल्याचे सफाई कामगार विष्णू गोरोबा आरदवाड यांनी सांगितले. उच्च
न्यायालयाने गोरोबा राम आरदवाड यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने
स्पष्ट केले की, सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा अधिकार
आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो सफाई कामगारांना लाभ होणार
आहे.
महाराष्ट्रातील सफाई कामगारांसाठी न्यायालयीन लढा उभारून त्यांना न्याय
मिळवून दिल्याबद्दल माजी मंत्री आमदार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
नुकताच बाभळगाव निवासस्थानी गोरोबा राम आरदवाड यांचा सत्कार करून त्यांना
शुभेच्छा दिल्या. यावेळी गोरोबा राम आरदवाड यांनी हा न्यायालयीन लढा
उभारण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांचे आभार मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0