विवेकानंद चौक ते बाभळगाव पर्यंतच्या दुभाजकाची स्वच्छता आणि सुशोभिकरण
विवेकानंद चौक ते बाभळगाव पर्यंतच्या दुभाजकाची स्वच्छता आणि सुशोभिकरण
लातूर प्रतिनिधी : सोमवार ६ जानेवारी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे लातूर
शहरातील पोचम्मा गल्ली येथील श्री. राजूभाऊ शिवाजी गवळी यांनी एक निवेदन
देऊन विवेकानंद चौक ते बाभळगाव पर्यंतच्या दुभाजकाची अत्यंत दयनीय स्थिती
असल्याचे निदर्शनास आणून दिले. या दुभाजकावर काटेरी झुडपे उगवले आहेत आणि
सर्वत्र कचरा पसरला आहे. यामुळे या परिसराची सफाई व्यवस्था बिघडली आहे
आणि या परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
नागरिकांच्या या निवेदनातील तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देऊन विवेकानंद
चौक ते बाभळगाव पर्यंतच्या दुभाजकाची स्वच्छता करण्याच्या दृष्टीने
आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्याची विनंती महानगरपालीका आयुक्तांना केली
आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली असून मनपाकडून सर्वप्रथम
दुभाजकावरील सर्व प्रकारचा कचरा काढून टाकण्यात आला, दुभाजकावरील काटेरी
झुडपे काढून टाकली, दुभाजकामधील मृदाची सुधारणा करण्यात येत आहे,
दुभाजकावर विविध प्रकारची फुले लावून तो सुंदर दिसण्याची व्यवस्था
करण्यात येत आहे. तसेच यानंतर या परिसराची नियमित स्वच्छता करण्याची
व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामामुळे लातूर शहराच्या सौदर्यात
निश्चीत भर पडणार आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0