राष्ट्र निर्माणात हिंदी कवींचे योगदान बहुमूल्य
राष्ट्र निर्माणात हिंदी कवींचे योगदान बहुमूल्य
लातूर दि. ०५
हिंदी कवींनी राष्ट्र निर्माणात बहुमोल योगदान दिले. त्यातूनच तत्कालीन काळातील स्वातंत्र्य आंदोलनात साहित्याची भूमिका महत्त्वाची ठरली असे प्रतिपादन दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. साईनाथ उमाटे यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय IQAC व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विस्तार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते. तर विचारमंचावर हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोहर चपळे, डॉ. धोंडिबा भुरे, डॉ. नयन राजमाने भादुले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. साईनाथ उमाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नियमांचे पालन करून राष्ट्र निर्माणात आपले सक्रिय योगदान द्यावे. आजच्या पिढीतील सर्व तरुणांनी कवींचा आदर्श घेऊन राष्ट्रा प्रती आपले प्रेम कृतीतून वाढवावे व चारित्र्यसंपन्न बनून राष्ट्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. हिंदी भाषेमध्ये अधिक गोडवा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हिंदी विषयासंदर्भात स्वाभिमान जागृत करून राष्ट्राप्रती आपली राष्ट्रभावना व राष्ट्रप्रेम आपल्या कृतिशील आचरणातून वृद्धिंगत करावे असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर चपळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा भिसे हिने केले, तर पाहुण्यांचा परिचय कु. मोहिनी गायकवाड हिने यांनी दिला आणि आभार विद्यार्थिनी कु. बुशरा सय्यद हिने मानले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमासाठी हिंदी भाषेवर प्रेम करणारे महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथ लांडगे आणि अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0